आपल्या मावळा प्रवासाची सुरुवात करा
महाराष्ट्र हे गडकोटांचे भूषण आहे. हे किल्ले म्हणजे शौर्य, स्वराज्य, आणि संस्कृतीची सजीव साक्ष. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने उभारलेली ही दुर्गं आजही आपल्या अस्मितेचे आणि इतिहासाचे प्रतीक आहेत. ‘आपला मावळा’ ही चळवळ या किल्ल्यांचे स्वच्छता, संवर्धन आणि जनजागृती यासाठी समर्पित आहे - कारण प्रत्येक दगडात इतिहासाचा श्वास आहे.
किल्ल्यांचा सन्मान, स्वच्छतेसाठी अभियान
यंदा संतश्रेष्ठ संत तुकाराम महाराजांच्या पावन भूमीत — देहू नगरीत, आपला मावळा व निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या वतीने, लोकनेते खासदार निलेशजी लंके यांच्या मार्गदर्शनाखाली, गड किल्ले मोहिमेऐवजी विशेष उपक्रम म्हणून “भक्ति शक्ती मोहीम” आयोजित करण्यात येत आहे..
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये वसलेला साल्हेर किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील ऐतिहासिक गड आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ५१७० फूट उंचीवर असलेला हा किल्ला महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ल्यांपैकी एक मानला जातो. साल्हेर व सालोटा हे जुळ्या किल्ल्यांच्या रूपात प्रसिद्ध आहेत साल्हेर किल्ल्याच्या संवर्धनासाठी “आपला मावळा” संस्थेने विशेष मोहीम आयोजित केली. या मोहिमेचा उद्देश गड संवर्धन, स्वच्छता, पर्यावरण संरक्षण आणि इतिहास जतन करणे हा होता.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला सिंहगड किल्ला हा पुण्याच्या नैऋत्येला सुमारे ३५–४० कि.मी. अंतरावर आहे. १६७० साली झालेल्या युद्धात तानाजी मालुसरे यांच्या शौर्यामुळे हा गड स्वराज्यात आला. “गड आला पण सिंह गेला” ही ओळ त्यांच्या बलिदानाची साक्ष देते. आज हा किल्ला ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असून इतिहासप्रेमी व निसर्गप्रेमींसाठी प्रेरणादायी ठिकाण आहे.
संख्या नाही, बदल मोजतोय!
स्वयंसेवक जोडले
ट्री गार्ड बसवले
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
सोलर एलईडी लाईट बसवण्यात आले
एकूण स्वच्छ केलेला परिसर
एकूण लागवड संख्या
गड पुनर्संचयित
कचरा उचलला
एकूण फलक/बाक लावण्यात आले
संख्या नाही, बदल मोजतोय!
स्वयंसेवक जोडले
ट्री गार्ड बसवले
सोलर एलईडी लाईट बसवण्यात आले
गड पुनर्संचयित
कचरा उचलला
एकूण कचरा कुंड्या बसवण्यात आल्या
एकूण स्वच्छ केलेला परिसर
एकूण लागवड संख्या
एकूण फलक/बाक लावण्यात आले
चळवळीचा आत्मा असलेली तत्त्वं